किसानवाणी : महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे सरकारला महत्वाचा सल्ला दिला आहे. लोकसत्ता वृत्तसमूहाने याबाबतची बातमी दिली आहे.
शरद पवार यांनी महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी झाली असली तरी, वेळेवर कर्ज फेडणाऱ्यांना अद्याप मदत करणं बाकी असल्याची आठवण राज्यातील ठाकरे सरकारला करून दिलीय. या शेतकऱ्यांना मदत बाकी आहे म्हणून राज्य सरकारने आर्थिक परिस्थिती नसेल तर कर्ज काढावे, अशी मागणी केली आहे. तसेच हा कर्जमाफीचा निर्णय एकदम शक्य नसेल तर १ वर्षात २-३ टप्प्यात घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) तालुक्यातील कार्यकर्ता आणि पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कर्जाच्या मूळ रकमेत माफी झाली. पण त्याशिवाय वेळेवर पैसे भरले त्यांना मदत करण्याचाही निर्णय घेतला होता. त्याचा काही भाग अद्यापही बाकी आहे. म्हणून राज्य सरकारशी बोलून त्याचाही निकाल घ्यावा लागेल. सरकारची परिस्थिती अडचणीची असली तर आम्ही सरकारला कर्ज काढा अशी विनंती करू. पण शेतकऱ्याच्या डोक्यावरील कर्जाच्या माफीचा निर्णय किमान १ वर्षात २-३ टप्प्यात करा,” अशी मागणी शरद पवारांनी राज्य सरकारकडे केली.
किसानवाणी | निसर्गामध्ये काही कीटक शेतकऱ्यांचे मित्र तर काही शत्रु असतात. या शत्रू किडी पिकांचे… Read More
नवी दिल्ली | पंतपधान किसान सन्मान निधी योजनेच्या (Prime Minister Kisan Samman Nidhi Yojana) लाभार्थी… Read More
किसानवाणी : शेतीतील पेरणीपासून कापणीपर्यंत आणि त्यापलीकडे कृषी क्षेत्रातील सर्व कामांमध्ये महिला शेतकरी वर्गाचे योगदान… Read More
किसानवाणी | भारताची अर्थव्यवस्था शेती क्षेत्रावर अधिक अवलंबून आहे. शेती क्षेत्राला भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा… Read More
किसानवाणी : कोरोना मुळे उद्भवलेल्या परिस्थितीने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांना त्यांच्या व्यवसायात मोठं नुकसान… Read More
किसानवाणी | महाविकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन करतेवेळी राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत कर्ज माफ… Read More